अंबरनाथचे शिवमंदीर हे संपूर्ण भारतवर्षातील पहिले भूमिज मंदीर जे अत्यंत कलात्मक आहे. शिल्पवैभवाची साक्ष देत वर्षानुवर्षे उन - पाऊस आणि काळाचा आघात सहन करत असलेले स्थापत्यशास्त्राचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे "अंबरनाथचे शिवमंदिर". अंबरनाथचे शंकराचे ११ व्या शतकात शिलाहार राजघराण्याने बांधलेले हे मंदिर आज महाराष्ट्राच्या कलापूर्ण वारशाची साक्ष देत उभे आहे.